भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .
ऑगस्ट म्हणजे पावसाळी दिवस, सर्वत्र हिरवळ पसरली होती. दगडांवर चिकट घसरण शेवाळ उगवलेली होती. सकाळी 10:30 वाजता आजिबात वारा नव्हता. प्रचंड गरम होत होंत. झाडांच्या सावल्या होत्या, पण तो गारवा शरीराला जाणवत नव्हता. चढनीच्या सुरुवातीलाच हनुमान आणि वेताळाचे मंदिर आहे. मी तिथे पाया पडले. तिथे भगवा झेंडा फडकत होता, त्याला अभिवादन करून पुढे जातच होते. तेवढ्यात एक माणूस हातात काठी, गळ्यात पट्टा घातलेला कुत्रा बरोबर घेवून खाली आला. कुत्राला यू यू करताच दोघेही थांबले. काहीतरी विचारायचे म्हणुन मी विचारले. आजुन कोण वरती आहे का? पण त्याने वरती कुणी नाही नीट जा म्हणाले. तो माणूस पुढे निघाला कुत्रा थोडा घुटमळला, मालका बरोबर जावे, की माझ्या सोबत यावे, ह्या विचारात होता, मालकाने यू ...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा