पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेंढर

 तीने रानातून मेंढर आणली.झोपडी बाहेर खुंटीला बांधली.आणि आत गेली.संध्याकाळ दाटून आली होती.घरात जेवणाचा पत्ता नव्हता,तेवढयात दारावर थपकी पडली.तिने घाईघाईने दार उघडलं ,दारात वस्तीच  दादा दडूकं घेऊन आला होता. बरोबर वस्तीवर ची 10-13 पोरं आणली होती. एकाने मेंढराला लाथ मारली आणि मेंढरू बोंबलत सुटलं, झोपडं खाली करायचं आहे की नाही. त्याने दरडावून विचारलं सुमीला काय बोलावे सुचेना, तिला धडकी भरली, अंगाला दरदरून घाम सुटला. अडखळत, चाचरत म्हणाली, धनी दोन दिस झालं घरला आला नाही. हे,,,,, त्याच्या आईबापापासूनचं झोपडं हाय, मी सोडून कुठं जावू? मग झोपड्याचं पैक टाक...  ही काय भानगड आहे. हे सुमीच्या लक्षात येत नव्हतं, पण नवर् चा पता नव्हता ते पण ह्याच काहीतरी भानगडीतून होतं ह्याची खात्री तिला झाली.  नवरा आला की जावू एवढं बोलली आणि सुमी खाली बसली. सारेजण धडाधड झोपडी बाहेर पडले.   विमनस्क अवस्थेत  घराच्या मधल्या टेकूला चिकटून सुमी बसली.तीला झोपड्यात काळोख दाटला हे देखील लषात आल नाही.ती कितीतरी वेळ तशीच बसली.बाहेर मेंढर मध्येच ओरडत होती...... थोड्या वेळाने ती जागची हलली,झोपडी...

कात भाग(२)31/1/2022

   दररोज आता मंजी (ती) गुरं घेवून कुरणातल्या मैदानात न थांबता दाट जंगलात गूरं सोडून त्या मुलांच्या झोपडी जवळ जावू लागली,  त्यांना  भाकर्या जेवण करून देवू लागली. ती थांबत असे तो पर्यंत  त्या पोरांचा  बाप पलीकडच्या  बाजूला असलेल्या गावात उतरून हव्या त्या वस्तू  आणत असे कारण आता त्याला मुल ंंएकटीच झोपडीत टाकून जायला लागत नव्हते.  एक महीना तिने आपला दररोजचा परिपाठ चालू ठेवला, दवबिंदूत भिजलेलं ओलं कुरण खावून गाई म्हशी भरपूर दूध देवू लागल्या, तशी भावजय  खुश झाली.  आपल्या मुलांना सांभाळायला, आपला संसार  सावरायला एक बाई मिळते, हा विचार करून त्यांनी मंजीला माझ्या झोपडीत कायम येवून राहशील का?माझ्या दोन लहान मुलांना सांभाळशील का?  विचारले.  तिच्या मनात हा विचार असला तरी घरी भावाला सांगणे तिला जमण्यासारखे नव्हत तिने दोन दिवसात झोपड्यात रहायला येईन. पण परत कधी मला तोडून गावात जायची वेळ येता कामा नये  सांगितले. आता ती खुश झाली होती.  तिने घरी जावून पेटारा   खोलला  साड्या काही  आणखी जुने नवे कपडे बेचक्य...

कात भाग (१)13/1/2022

  ती काम आटपून परसात झाडाखाली चौपाई वर बसली होती. अचानक तिचे लक्ष झाडाच्या बुंद्याजवळ गेले. पांढरीशुभ्र जवळ जवळ सहा फूट लांब कात पडली होती. जनावर कात टाकून चकाकतं अंग घेवून त्यातून बाहेर पडल होतं, ती विचार करत  बाजूवर पहुडली  काय? चुकलं होतं तिचं ! ती अशिक्षित असली तरी तिलाही मन होतं,  आपला जीव प्यारा होता.  घरात नवरा दोन  नणंदा, दिर, सासु सासरा, नवरा मंद कुणीही काहीही सांगितले  तर  नंदी बैलासारखी मान डूलवायचा,  आणी डोक्यात  राख घालून घरी येवून वायकोला  मारायचा सासू सर्वाशी गोड गोड बोलायची पण घरात फटाकडी कधी चुलीवर पडेल नी वाजेल नेम नाय, सासरा बेरकी, बाता करण्यात पटाईत ,इथे चौर्या कर मार्या कर. लबाड्या कर.नणंदा छचोर, कामचोर, लाडीक नटण्याथटण्यात पटाईट! दिर रागीट जणू डोळ्यातच विष ओढलेल्या नजरेचा ,त्यात पाण्याची पंचाईत उन्हात, तासनतास चालत जावून सात सात भांडी डोक्यावर घेवून यायचं, इतक्या माणसाचं कपडे रोज एकटीन धुवायचं, जेवणं करायची! भांडी घासायची नी डोंगर  धुडाळाला जायचं,  नकळत तिच्या डोळयात पाणी  चमकलं,आकाशत नजर लावत ति...

मिलन

  तुम्हारे एक मिलन को  न्यौछावर कर दिया  अगले  हजारो  मिलन के लिए....... वर्षा पाटील©®🌹

सिलसिला

  गुनाह किसी और ने किया और  ख्वाब हमारे तुट गए  कत्ल किसी और ने किया और सजा हमने पायी बेवफा  कोई और था और बदनाम हम हुए मकान किसी और ने तोडा और बेघर हम हो गए  पैगाम किसी और के लिए था, और मरना हमें पडा.... ये सिलसिला बरसों से चालू रहा,रोकने वाला कोई न था..  हाथ अपनोंने छोडा  थामने वाला कोई न था... . वर्षा पाटिल ©️®️🌹

इज्जत(लाज)10/2/2022

 लड़की के सिर से दुप्पटा  गिर जाए, तो लडकी  की इज्जत (लाज)नही जाती...  बुरे नजर से देखने वालों की नियत दिखती है... वर्षा पाटिल ©️®️🌹

अंदाज 10/2/2022

 अंदाज नव्हता मला     तुझ्या वाराचा     बेसावध क्षणी   केलेल्या घावाचा!  नव्हतेच कधी बंध जोडण्याचा प्रश्नच नव्हता तुटताना मात्र अंदाज नव्हता तुझ्या खेळीचा ! वर्षा पाटील ©️®️🌹

अनुभव

 चांगल सुचायला आयुष्यात काहीतरी चांगल असायला हवं ना? 🤔अनुभव जसं असेल तसे लिहायला सांगणार ना?  वर्षा पाटील ©®🌹

उसूल2/2/2022

 जिंदगी के कुछ उसुल होते है ,  कुछ पाने के लिए वो तोडना,   या शाॅर्टकट अपनाना  ये मंजूर नही, वर्षा पाटील. ©®🌹

लब्ज2/12/2022

 दो लब्जों से जिंदगी    संवर जाती है,   या उजड जाती है,   हर एक लब्ज की   अलग कहानी.   वर्षा पाटील.©️®️🌹

किंमत 02/02/2022

 एखादा तूम्हाला डावलून दुसरीकडे जातो, तेव्हा तुमची किंमत शुन्य ठरवायचा प्रयत्न होतो. पण आपल्याला नाकारणारा ज्ञानी असेलच असं नाही. तो मार्ग  चुकलेलाही असू शकतो, किंवा त्याचंं अतिंम ध्येय हे आपल्या ध्येयापेक्षा, किंवा आपल्या कडील असलेल्या गोष्टी/विचारापांसून वेगळ असू शकतं  वर्षा पाटील©®🌹

दानशूर 4/02/2022

 दुसंर्याच चोरून स्वताची  झोळी भरली  आणि  कितीही श्रींमती वाढली तरी ती  भीकच असते, आणि कितीही दानशुराचा  आव आणला तरी पुण्य ज्याच चोरलं  त्याच्यच पदरी....  वर्षा पाटील. ©️️ ®️🌹

प्यार

 क्या प्यार  दुश्मनसे हो जाए  तो वो दुश्मनी भूलाकर  प्यार मे बदल जाएगा,  या वही मौके का फायदा  उठाकर हमें  जिंदगीसे उठा लेगा प्यार क्या सोच समझकर करने की  चीज है?  वर्षा पाटील. 🌹©®

गलती

 एक बार प्यार मे धोका खानेवाला  बार बार वहीं गलती नही करेगा?  उससे क्या होगा सचमुच का प्यार भी  उसके नशीब मे  नही होगा एक बार दुध से मुहॅ जलने के बाद  छाछ भी फूंक फूक कर पी लेते है   वर्षा पाटील©®🌹

भावना

 शब्दाला अर्थ असतो तसेच त्याने भावना व्यक्त करता येतात.म्हणूनच सात्वनांपर भाषणं प्रेमपत्र, लिहीली जातात.लिहीलेल़ एखाद्याला समजत नसेल तर त्याची समज/बुध्यांक कमी असतो.भाषा ही भावना व्यक्त करण्याच़ माध्यम आहे भावना कळत नसत्या तर प्रेम कविता लिहील्याच गेल्या नसत्या. इतकच आहे की कोमल मनाला त्या जितक्या भिडतात तितक्या कठोर अंत:करणावर आपला प्रभाव टाकू शकत नाही.  वर्षा पाटील. ©®🌹

विश्वासघात

 काल मी तूला दुसरीच्या  मिठीत पाहीले, आणि  प्रेमावर  लिहीलेली  कविता हारले  वर्षा पाटील©️®️🌹

साथ

 अपनोनें साथ छोडा तो लगा  प्यार धोका नही देगा.. 🌹 लेकीन प्यार ने कहा, मै  अकेला क्या कर सकता हूँ  जब काफीला तुम्हें छोडकर  आगे निकल गया....  मैंने कहां , मै जिकर क्या करू जब रब नेही साथ छोडा... वर्षा ©️®️🌹

मोम

 जब गुस्सा हो जाओगे  तो मोम की तरह  पिघल जाना  दुसरो को रोशनी  देकर तुम खुद  नम हो जाना  दुसरो के जिवन का अंधेरा  मिट जाएगा  धागा भी खत्म होगा  तुम बिखर के  रह जाओगे खुद को समिटकर  अस्तित्व बनाकर  रखना ....🌹 वर्षा पाटील©️®️🌹

छटा

 एकाच माणसाचे वागणे हे दोन वेग वेगळ्या माणसांशी वेगवेगळे असते. त्यामागे प्रेम, स्वार्थ, मैत्री, शत्रुता,आपुलकी, ऋणानंबध , अशा अनेक छटा असतात, आणि  एका साठी तो चांगला व दुसर्या साठी तो वाईट असतो. दोघांसाठी त्याचा भिन्न  स्वभाव ,हा त्याच्या वैयक्तिक, फायद्यातोटायावर अवलंबून असतो. 🌹 वर्षा पाटील©️®️🌹

आठवण

 भंगलेल्या वास्तूचे रूप पाहून मला उमजून  आले.   आपल्या प्रेमाची साक्षही  आपली साथ सोडू पाहते,  तो वळणा वळणाचा रस्ता  आता डांबरी होवून राहीला    तो झाडावरील  कोकीळ  साद घालीनाशी झाला,  खळखळता  झराही आता नाल्यात जमा  झाला.    खेळलेले खेळही  आताशी इतिहासजमा झाले.  आंबा बोरीची झाडे जळिफाट्या मध्ये गेली  आताशी मलाही तुझी  आठवण होवू लागली.  वर्षा पाटील. 🌹©️®️

प्रेमभंग

 जेव्हा शब्द ही भावना व्यक्त करायला नकार देतात.....  जेव्हा डोळे ही बोलावयास  नकार देतात. . ज़ेव्हा ओठही विलग होताना   थऱथरतात ... तेव्हा प्रेमभंगाची लक्षणे दिसू लागतात.  वर्षा पाटील. ©️®️🌹

संयम

 निस्सीम प्रेम ,वागण्यात सहजता, वाईट गोष्टीपासून चार हात दूर,  आणि कधी वाट चुकलातच, तर मनावर संयम ठेवा ,तुम्ही कधी कुणाच्या जाळ्यात अडकणार नाहीत. आणि जीवनात अर्धा अधिक  ताण निघून जाईल.  वर्षा पाटील©®🌹

एनर्जी

 तुम्ही कारण नसताना जेवढ्या धुर्त  खेळी खेळाल, तेवढे त्या रचण्यात आणि कुटील चाली खेळण्यात आपली चांगली एनर्जी  फुकट घालवाल. वर्षा पाटील©®🌹

विचारांच पुस्तक 3/2/2022

 दुसर्‍याने लिहीलेलं चोरुन आपल्या नावाने प्रसिदध करता येईल. पण विचारांच पुस्तक चोरता येईल का कधी?  वर्षा पाटील ©®️🌹

क्षल्य

 काहीच अपेक्षा नसताना एखादी गोष्ट मिळाली तर त्याचा आनंद वेगळा असतो, अपेक्षाभंगाच क्षल्य टोचत रहात.. वर्षा पाटील©®🌹

क्षमा

 पून्हा एकदा मी तूझ्या दाराशी आले,  चुक झाली म्हणून क्षमा मागून गेले.  क्षमा मिळाली,दर्शन ही मिळाले अपराध नसताना मला अशी  कोणती शिक्षा मिळाली  वर्षा पाटील©®🌹

मी

 तुझ्या कडे "मी "होते,  पण "मी" नव्हते,  तुझ्या मिठीत "मी "होते  पण "मी" नव्हते,  तू मला गोंजारले,  तू मला कुरवाळले  तरी "ती" "मी" नव्हते,  तु स्पर्शले ,ते "मी "जाणीले  तरी ''तीी'' "मी "नव्हते,  कान्हाने राधीकेला छेडले,  ते सत्यभामेने हेरले  रुख्मिणीला स्पशले,  कशी सांगू मी 'हे ' "प्रेम"  त्या प्रेमाहून ''वेगळे. ..''   वर्षा पाटील ©️®️🌹

विस्थापन

 तूझे आणि माझे जीवन पाण्यात पडलेले आपलेच प्रतिबिंब! तू काठावर अन मी पाण्यात.....  आपले ‘जिवन,‘ कितीही सारखे असले तरी एकत्र नाही येवू शकत. . तूझ्या विस्थापनाने माझे अस्तित्व संपून जाते   वर्षा पाटील ©®🌹

पहाट

 जिवनाला काही अर्थच नाही उरला असे जेव्हा वाटते ,तेव्हा सर्व स्वप्न भग्न  पावलेली असतात, पण पहाट मात्र  व्हायची राहून गेलेली असते.   वर्षा पाटील. ©®🌹

शापित बाळे

 स्वर्गातील शापीत बाळे  अवनीवर येवून पडतात,    शांत तेजस्वी चेहर्याने               आपले वेगळे  अस्तीत्व   दाखवू पाहतात...   निसर्गात लीन होतात,    आपल्या परीने जगू   पाहतात, पण....   पातकी आत्मे आपल्या   क्रुरतेने, त्यांचे   जिवन उध्वस्त    करतात.    वर्षा पाटील.©®🌹 उरण नवी मुंबई 

स्वप्न

 कशी असतात ना,  स्वप्न आपली, ? पूर्णत्वाला येतात,  तेव्हा आयुष्याची संध्याकाळ झालेली असते.  तरी त्यातूनच पहाटेची  वाट पहायची असते.  वर्षा पाटील. ©️®️🌹

भ्रम

    गोड बोलून फसवण्यापेक्षा,     खरं बोलून आपली नियत       दाखवावी, म्हणजे माणूस       भ्रमात रहात नाही.  वर्षा पाटील. ©®🌹

विश्वासाचं नात

 असं विश्वासाचं घट्ट नातं  तयार करा,  की कुणीही कितीही त्यात काटा घातला तरी त्यात कटूता येणार नाही. लबाडी/कपटानी नाती संपुष्टात येतात, आणि  त्यांनी मिळणारा फायदाही दिर्घकाळ नसतो.  परत तसंच  विश्वासाचं नातं त्याच  माणसाशी तयारही करता येत नाही. वर्षा पाटील.©®🌹

गणित

 एखाद्या  माणसाने आपल्याला मदत केली असेल किंवा आपल्यावर एखाद्याचे उपकार झाले असतील, नकळतपणे त्याच्याकडून सेवा घडली असेल तर त्याचे आभार माना, परतफेड करता  आली  नाही तरी चालेल, पण गरज संपली की  त्यालाच धडा शिकवण्याचे गणित करू नका.  वर्षा पाटील©️®️🌹

शिक्कामोर्तब

 तुमचं लिखाण 📝तुम्हीच लिहीता ✒️यावर तुमच्या नावाचं  🖊शिक्कामोर्तब 📧असतं की दुसर्या दिवशी  त्यावर कुणी हक्क 🔨दाखवतं मला पडलेला गहन प्रश्न ❓‼️🤔🤔 वर्षा ©️®️🌹

ताण-तणाव

 निस्सीम प्रेम ,वागण्यात सहजता, वाईट गोष्टीपासून चार हात दूर,  आणि कधी वाट चुकलात, तर मनावर संयम ठेवा ,तुम्ही कधी कुणाच्या जाळ्यात अडकणार नाहीत. आणि जीवनातील अर्धा अधिक  ताण तणाव निघून जाईल.  वर्षा पाटील©®🌹

एनर्जी

 तुम्ही कारण नसताना जेवढ्या धुर्त  खेळी खेळाल, तेवढे त्या रचण्यात आणि कुटील चाली खेळण्यात तुमची चांगली एनर्जी  फुकट घालवाल. वर्षा पाटील©®🌹

व्यवहार

 पैसा हे व्यवहाराच माध्यम कधीपासून आहे, हे माहीत नाही, पण ते माणसाला इतकं प्रिय झालं की.त्यासाठी लोक माणूसकी,भाउबंदकी विसरून गेले.त्याने जी जी सुख लाभू शकतात ती ती मिळवू लागले. त्यासाठी आपल्या आतल्या आवाजाला दाबून चोर्या,लुटमार,दरोडे घालू लागले. प्रंचड अफरात अफर करू लागले. पैसा हे फक्त व्यवहाराचं साधन आहे हे लोक साफ विसरून गेले.पण काही व्यक्ती इतक्या नीच असतात की ते एखाद्याच्या नशीबातील काढून तिसर्याच कुणाला तरी देतात. ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, वडिलोपार्जित ,        ( उच्च शिक्षित,व्यापारी डोक्याने एकाजागी बसून कमवतात) स्वत : कमावलेला पैसा त्याला मिळू नये म्हणून हजारो उच्चापात्या करतात. जसं आपल मन आपलं शरीर सुख लोलुप असतं तसं प्रत्येक नश्वर  शरीर उंची कपडे, दागिने, सौर्दयप्रसाधन वापरण्यास इच्छुक असतं. सांगण्याचा मुद्दा ज्याचं त्याच्यापाशी रहावं म्हणून बँक नावाची सुरक्षाव्यवस्था सुरू केली.आता बँकेतही डोक्यात किडे वळवळणारा माणूस नावाचा क्षुद्र प्राणी आपल्याला  नेमून दिलेले काम न करत,आपल्या कामाशी प्रामाणिक न राहता त्यातही भ्रष्टाचार, अफरात अफरी करू लागल...

उंची

 एका ठराविक उंचीच्या श्रींमतीनंतर  सारे जनहितासाठी असते. आणि तो माणूस जगाला आदर्श असतो. पण ती उंची त्याच्याजवळच असायला पाहिजे.  वर्षा पाटील ©®🌹

चूका

 चूका करून चुकातूंन शिकण्यापेक्षा चुकाचं करू नका, त्यासाठी आईवडिल/इतर योग्य गुरू निवडा, चांगल-वाईट काय ह्याची योग्य जाण ठेवा. यश हात जोडून तुमच्या जवळ उभं राहील.  ©®🌹

काम

 दुर्लक्षित  केलेला माणूस कोलाहल पासून दूर आपलं हवं ते काम सहज पार पाडून जातो. ते इतरांच्या तुलनेत दुय्यम असलं तरी त्यात अडथळे  नसतात.  वर्षा पाटील©️®️🌹

मोह आणि लालसा

 सोन्याची अंडी देणारी कोंबडी कुणी कापत नसतं, पण तिला परीसरात भटकूही दिलं जात नाही. तिला खुराड्यातच आडकवलं जातं,  मोह आणि लालसा खूप वाईट गोष्टी आहेत.  वर्षा पाटील. ©®🌹

मानसिकता

 जगात  विनाशकारी शक्ती जास्त वाढत आहे, कारण अडचणीत मदत करणार्याचा,आपलं चांगल   चिंतणार्याचा देखील अपमान करणं ,त्यांच्या मागे नको ते शुक्लकाष्ठ लावणं,ज्यांच वापरतो त्यालाच त्रास देणं अशीही लोक असतात, अशा लोकांची 🤔 मानसिकता काय असावी. स्वार्थ, अपुरे ज्ञान, की क्षणभराचे सुख, की काही मोठे घबाड हस्तगत करणे? वर्षा पाटील©®🌹

मालकी हक्क

 दुसर्याच्या जागेवर आपला मालकी हक्क दाखवताना ती जागा आपली समजून तीचा गैरवापर करून तिची विक्री करताना(पैशांच्या लालसेने) माणूस हे विसरतो,की हजारो वर्षे वसुंधरा आपल्याच जागेवर आहे,आणि तिचीअशी कित्येक वर्षे खरेदी-विक्री होत असली तरी आपल्या उण्यापुऱ्या १००वर्षाच्या आयुष्यात आपण त्या जागेवर हक्क दाखवतो,ज्या जागेसाठी भांडतो तिथे आपण गेल्यावर कुणीतरी दुसराच त्यावर हक्क दाखवतो.आपलं अस्तित्व नसताना! वर्षा©®

विभक्त पती

 एखाद्या वेळेस पतीपत्नी वेगळे झाले,व त्यांच्या नावे काही संपत्ती मिळाली,तर 90% शिकलेले लोक ती संपत्ती पतीने कमावलेली आहे असं गृहीत धरून त्याला देवून टाकतात ,खर्या अर्थाने त्या संपत्तीशी विभक्त पतीचा व त्याच्या नातेवाईकाचा काहीही संबध नसतो स्त्रीच्या बुद्धीमत्तेला तुच्छ लेखून पुरुषसत्ताला प्राधान्य देण्याची मानसिकता अजूनही आपल्या इथे आढळते.महत्वाचं म्हणजे ती संपत्ती आपलीच समजून विभक्त पती। तिचा मनोसक्वात वापर करतो. 

आशय

 आपण मनोरंजन म्हणून प्रेमकहाण्या असलेले कौटूबिक,हँप्पी एंडींग पिश्चर, सिरीयल पाहतो,कथा थोडीफार वेगळी पण आशयं तोच आपल्याला जिवनातही थोडेफार तसंच आवडत असतं,तेव्हा जास्तीत जास्त तसचं रहायचा, वागायचा प्रयत्न केला तर इतरांच्या व आपल्या जिवनातही आनंद निर्माण होईल. इतरांच्या आयुष्यात काटे पेरून आपलं आयुष्य सुंदर होत नाही. तसंच इतरांच वाईट करून आपल फार काळ भलं होत नाही.   वर्षा पाटील®🌹

हजर

 दुःखात मी तूला साथ दिली,  सूखासाठी तू दुसरर्याची  निवड केलीस,  माझे मलाच सुख मिळवता येते का ?पाहण्याचा निर्धार  केला, आणि तिथेही तू   '" हे माझेच कसे"   सांगावयास हजर झालास! वर्षा पाटील ©®🌹

उसनं

 आई लहानपणी शिकवायची, उसंन घेतलेलं परत करायचं असतं,काकूकडून घेतलेली साखर परत देवून ये जा! शाळेत घेतलेल्या पाटीवरील पेन्सीली, पेन,आठवणींनी परत करायचो! लोकं, काय काय उसनं घेतात!नोकरी,,पैसा,गाडी,बंगला,सहल,घरदार चाकर ,कपडे,दागिने, नशीब जिवन आणि  जगणंसूद्धा!परत द्यायचं नावसूद्धा काढत नाहीत! दारात यम येतो,तोही संभ्रमित होतो नक्की आयुष्य संपलय कुणाच लहानगीचं म्हातारीचं,की घरच्या लक्ष्मीच! वर्षा पाटील ©®🌹

सामाजिक बांधिलकी

 बरोबर चालणारे,  समांतर चालणारे एका सरळ रेषेत  चालणारे... उलट्या दिशेने  प्रवास करणारे , तिरकस चालणारे गोल,  गोल भवर्यात अडकणारे, सारे सामाजिक बांधिलकी  जपणारे....  तरी एकमेंकाला सतत  पाण्यात पाहणारे   वर्षा पाटील. ©®🌹

दिल

 अब हमारे पास वो 'मुकाम 'नही,  वो फुर्सतभरा 'वक्त 'नही,  वो चहकता 'मन' नही,  वो 'मुस्कान' भरा,  प्यारासा 'चेहरा ' नही,  वो 'रिश्ते' नही, जो हम,  'जताना 'चाहते थे कभी, वो  'गम' भी नही,  जो आप हमें 'दिलाना ' चाहते थे कभी,  है,  तो सिर्फ एक 'खालीपन,'  जहाँ क'भी ' 🌹'प्यार' भरा  दिल ❤ रहा करता था,  वर्षा पाटील. ©®🌹

कुछ खास

 किसीका  कुछ "खास"होने के लिए  कुछ खास "वजह" तो चाहीए  कुछ लम्हें , कुछ चाहते  कुछ उम्मींदे, कुछ सिलसिले...  ऐसेही कोई किसीका "खास " नही होता....  वर्षा पाटील ©®🌹

कोलाहल

 भयाण शांतता उगाचच आयुष्य सरून चालल्याची ग्वाही  देतो,  हदयात कालवा कालव करतो. पूर्ननिर्मिती, आपल्याच माणसांचा  कोलाहल त्यावर दिलासा देतो, वर्षा पाटी©️®️🌹

मित्र

 मित्राची उतुंग भरारी नक्की काय आहे,ते कळत नसणारा,पण आपला मित्र काही तरी खूप मोठा झालाय,म्हणून त्याला हवी ती मदत करणारा आणि त्याला मान देणारा सच्चा आणि सुदामा सारखा मित्र असावा, गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारा,मनातं सतत हेवा करणारा ,पण सतत आपल्या बरोबर राहून   आपल्यावर नजर ठेवुन आपल्या शत्रुला आपली  माहीती देणारा आपल्या चांगुल पणाचा गैरवापर करणारा मित्र नसावा. तोच आपला शत्रु असतो.  वर्षा पाटील©®🌹

जिवन

 पाटीवरचं सर्व पुसून परत एकदा ह्याच जिवनात  जिवन जगायला नाही का मिळणार? चूका तर सुधारायच्याच आहेत पण खूप अशा गोष्टी थोडं धारीष्ट  दाखवून  करायच्या राहून गेल्यात त्या वेळच्या वेळी करायच्या आहेत. कुठे कुठे वेडपटपणा केलाय, कुठे मैत्री करायच्या गप्पा मारायच्या, फिरायचे राहून गेले, काही महत्वाचे सांगायचे, बोलायचे राहून गेले ते करायचे आहे.  वर्षा पाटील. ©️®️🌹

कलियुग

 आजकालचे आउटफिट(फँशनेबलड्डेसं) पाहून वाटत नाही की कुणी (वस्त्रहरण होताना)कान्हाला आळवत असेल. म्हणजे फँशन जगताने कृष्णाचीच किंमत काढून टाकली. तसेच चिंध्या फँशन म्हणून अंगी बाळगताना द्रोपदीच्या भरजरी शालु फाडतानाचे तिच्या ज्या भावना भावना त्या कवडी मोल केल्या. वा रे! कलियुग🤔🤭🙃

चूक

 दुसर्याच्या चुकीमुळे आपली अनमोल चीज/हवीहवीशी वाटणारी वस्तू/ गोष्ट कायमची हरवली असेल, किंवा दुरावली असेल तर आपण त्या व्यक्तीला कधीच माफ करत नाही . वर्षा पाटील.  ©️®️🌹

विखारी शब्द

 विखारी/ विषारी असो, सत्य असेल ते आपल्याला माहीत असेल,तर बोलावेच लागते आणि आपलं भाडंण आपल्या प्रेमळ माणसांबरोबर नाही होतं, सतत आपलं नुकसान करणार्या माणसांबरोबरच होतं, कारण एकदाच चुक होते, परत परत नुकसान करणारे मुद्दाम करत असतात.    जर एखाद्या चांगल्या माणसां बरोबर कुणी मुद्दाम भांडत असेल तर त्यातही त्यांचा स्वार्थच असतो.किंवा  त्याला बदनाम करण्यासाठी करतात.  वर्षा पाटील. ©️®️🌹

भावनीक ओलावा

 जसजसं माणूस परिपक्व  होत जातो ,तस तसा त्याच्यातील भावनीक ओलावा कमी होत जातो त्याच कारण निरागसते कडून त्याचा प्रवास वास्तवते कडे चालू असतो.  वर्षा पाटील ©️®️🌹 उरत नवी मुंबई 

शंका

 एखाद्या गोष्टीवर जास्त विचार करून मनात शंका निर्माण झाल्या, की त्यातील आंनद हिरावला जावू शकतो.परंतु कधी बिनधास्त राहून बेसावध राहून नाही ती आफत ओढावून घेण्यापेक्षा चांगले. वर्षा पाटील ©️®️🌹

जत्रा(10/ Jain/ 2022)

 उरलेली तिन्ही खेळणी संपवून रमाकांत  घरी जायला निघाला उर्मिला नी दिलेली नोट त्याने पाकिटात वेगळ्या कप्प्यात  ठेवली आठवण म्हणून ! त्याने देवाला लांबूनच नमस्कार  केला. घरी प्रसाद  म्हणून काही न्यायची त्याला इच्छा  झाली नाही. त्याच्या पहिल्याच प्रयत्नात  त्याला यश लाभले. आईचा, देवाचा  आशिर्वाद  लाभला. आजची कमाई ही त्याने एका दिवसात कमावले असले तरी ते पगारा सारखे एका महिन्याची, कमाई होती.त्याने कमावलेले पैसे हा एका कंपनीच्या सी. ई. ओ.च्या महिन्याच्या पगारा एवढे होते. पण त्याचे मन आनंदी समाधानी झालं नाही. तो ह्या शहरात परत येणार नव्हता.  घरी  गेल्यावर त्याने गरम पाण्याने अंघोळ केली. देवाजवळ आपल्या धंद्याची पहिली कमाई ठेवली. आईच्या हातचे गरम गरम जेवण जेवला. आणि आई काही विचारायच्या आत झोपी गेला.  तिन्ही खोकी  परत आणली नाही हे पाहून आईने हुश्य! केले, आई बाबा संध्याकाळी शेतवरून  परतल्यावर त्याने आई बाबांच्या हाती एक तिहाई  रक्कम ठेवली. इतके पैसे एका दिवसात कमावलेले पाहुन आई हरकून  गेली,  मुलाची एक महिन्याची मेहन...

जत्रा 9/ jan/2022

 एक वर्षात रमाकांतचे शिक्षण पूर्ण  झाले. उर्मिला ला मुलगी झाली. तिचा सासरी छळ होतोय. इतकच त्याला माहीत होतं, पण उर्मिलाशी आता त्याच  काही  नातं नव्हतं, तो नोकरी  शोधू लागला, त्याने चार वर्षात दोन नोकऱ्या  केल्या,  त्याची नोकरी सुटली. आणि उर्मिलाचे लग्न तुटले, पण ती गावात परत आली नाही, साधीशी नोकरी करून तेथेच  कुठेतरी राहु लागली. तिचे आई वडील  तिला मदत  करीत ,एकदा धाडस करुन रमाकांत ने तीचे घर शोधले, रस्त्यात गाठले, आपण एकत्र येण्याची म्हणुन विनंती केली. पण उर्मिला  तयार झाली नाही. आता  परत त्याच्याकडे  नोकरी  नव्हती.. ...  उर्मिलाची तंद्री भंगली  प्रशाली आईला तयार केलेले विमान कसे उडते ते दाखवत होती. टाळ्या वाजवत होती. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.  दोन दिवस राहून बाबा गावी घरी निघून गेले. उर्मिला  व प्रशाली परत दोघीच राहील्या. उद्या तिला प्रशालीला शाळेत सोडून पूढे कामावर जायचे होते.  तो तासनतास बसून  विचार करे... त्याला एक भन्नट कल्पना सुचली. .... क्रमशः(८) वर्षा पाटील©®🌹 ....

जत्रा 9/jan/2022

 आई आणि प्रशाली खेळणीवाल्या जवळ गेल्या, त्याच्या कडे तीन- चार खेळणी होती . त्यातील एक मात्र विमान होते. प्रशली खूष होवून आईला म्हणाली ते बघ विमान!  त्याला आश्चर्य  वाटलं सकाळचीचं मुलगी जिच्या साठी आपण एक विमान बाजूला काढून ठेवले होतं, त्याने विमान मुलीच्या  हातात दिलं प्रशालीच्या आईने त्याला 100 रुपयाची नोट दिली. तसा तो थोडा घुटमळला नोट हातात घेत म्हणाला अजूनही येत असलीस तर चल! आज मी एकाही खेळण्यावर  एकही रुपया कमी  केला नाही. आज मी 1500 खेळणी विकली. ही माझी एका दिवसाची कमाई ,एका महिन्याची मेहनत आहे. आई बाबांनी घरात घेतलं नाही  तरी मी विश्वासाने तूला सांभाळीन, आज रस्त्यावर  मी एवढी कमाई केली आहे. तूला काही कमी पडू देणार नाही. तिने मान वर करून पाहीलं 10-15 मिनिटांत बराच रस्ता मोकळा  झाला होता. तिने मुलीला उचलून घेतलं आणि झपझप रस्ता  चालू लागली. डोळ्यासमोर  अंधारी येते की काय वाटू लागलं, डोळ्यातील पाण्याने समोरील रस्ता दिसेनासा  झाला. घरी आल्यावर  मुलगी ते विमान उघडून लावू लागली आणि आजोबा तिला मदत करू लागले. .. . तिच्या मनात...

जत्रा 9/ jan /2022

 दुपारी तीन नंतर पुन्हा जत्रेत गर्दीला सुरूवात झाली, त्यांना आपल दुसरं खेळण्याचं खोक फोडलं, सकाळी  घरी घेवून जाणार्या मुलांची खेळणी पाहुन खुप सारी मुले ते खेळणे घ्यायला येत होती. आनंदाने हवे ते खेळणे विकत घेत होती. रात्री सात नंतर त्याने  तिसरं बाँक्सच्या फोडला हा शेवटचा बाँक्सच्या  संपो ना संपो त्याचा धंदा मस्त झाला होता. तिसर्या बाँक्सची खेळणी बाहेर काढताना त्याला सकाळची बोनी  करायला आलेली लहान मुलगी आठवली, तिला विमान हवे होते. तिची आई परत येते,  म्हणून गेली आणि आलीच नाही. ती हे  'खेळणं' बाजारातील  इतर खेळणी आणि खाऊ ह्यामध्ये विसरून सुद्धा गेली असेल पण त्याला उगीचच चुटपूट लागली आता तर ती मुलगी ते खेळणं नयायला येण्याची शक्यताही संपून गेली. त्याने तिसर्या बाँक्समधील 20-25 विमानातील एक विमान बाजूला काढून  ठेवले.. . ..   आज त्रिपुरी पौर्णिमाचा उपवास सकाळ सकाळ देवदर्शनाला  गेले तर भली मोठी लाईन नंतर सर्व बाजार फिरले गृहोपयोगी वस्तु पण जत्रेत छान मिळतात छोटीला हवा तो खाऊ खेळणी घेवून आले पण  तिला आवडलेलं कोणतंतरी  खेळणं वि...

जत्रा 6/jan/2022

 त्रिपुरी पौर्णिमेच्या आदल्या रात्री रमाकांत   जेवून आई बाबांना नमस्कार  करून रिक्षात 3 खोकी घेवून निघाला. निघताना आईने जमवलेले एक हजार रूपये हातावर ठेवले. त्याने नको आहेत खर्चाला माझ्याकडे म्हणाला .बाबांचा  हातही खिशात  गेला बाबांना नको आहेत माझ्या कडे  मला जायला असले म्हणजे पुरे मी पैसे कमवायला चाललोय.असे म्हणत, पायऱ्या उतरला. त्याने रिक्षा स्टँडकडे वळवली. रात्रीची वेळ आणि 6-7तासांचा प्रवास त्यामुळे  बसमध्ये  फक्त 4-5 माणसं, त्याने खोकी सीट खाली लोटली. तिकीट काढलं नी बाहेरच्या  खोक्यावर अलगद आडवा पाय ठेवला की कुणी खोका  खेचू शकणार नाही आणि सरळ सीटवर आडवा झाला.नी  झोपी गेला.  सकाळी तीन वाजता तो एस टी च्या आवारात उतरला. तिन्ही खोकी  खाली उतरवली, आजूबाजूला रिक्षा पाहू लागला तेवढ्यात  एक रिक्षा येवून बाजुला उभी राहिली .भाडं ठरवून तो रिक्षात बसला. 20 मिनिटात चढण चढून तो शंकराच्या  देवळाजवळ  पोहचला  बरेचसे पायर्‍या आडवून काहीबाही विकत बसले होते. अजून सकाळची आरती झाली नव्हती. पायरी पासून थोड दुर पण मेन...