सकाळची काम आटपून अपर्णा चहाचा कप घेवून वर्तमान पत्र वाचत बसली, आणि अचानक तिच्या मनात कालचा विचार डोकावून गेला. तशी ती लगबगीने उठली, आणि गॅसवर आधण ठेवलं , डब्यातून रवा शोधून काढला, साजूक तुपात खरपूस भाजून काढला त्यात, दूध उकळवून ओतले, वेलची ची बारीक पूड ,चारोळी, काजू, बदाम, किशमिस, जायफळ टाकले, फळातील दोन केळी कुस्करून त्यात टाकली, रवा शिजलाय का पाहून, त्यात साखर घालून बाजूने साजूक तूप सोडले व ़झाकण लावून एक दणाणून वाफ आणली, फ्रिजमध्ये फूल ,फळ ,काढली देवाची पूजा केली. फूल वाहीली, फळांचा, शिर्याचा नैवेद्य दाखवला. नैवेद्याचा शिरा नविन डबा घासून स्वच्छ पुसुन त्यात भरला, चार प्रकारची फळ पिशवीत भरली, पानांत गुंडाळलेले दोन गजर्यापैकी एक गजरा स्वताच्या डोक्यात माळला दूसरा पिशवीत टाकला, नी बाजारात जाण्याइतपत नवी साडी नेसून घराची चावी घेवून लँच लावले, व समोरच्या फ्लॅटची बेल दाबली, खूप वेळाने ८५-९० कडे झुकलेल्या गृहस्थाने दार उघडले, व त्रासिक नजरेने पाहून विचारले काय आहे? त्यांच्या प्रश्नाने अपर्णा ला आपण उगाचच शहाणपणा केला असं झालं, ती क्षणभर थांबून म्हणाली , मी अर्पणा तूमच...