पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खंड १ला टाईम मशीन भाग:७

इमेज
कपील मुनींचीं क्षमा मागून  गंगाजल शिंपडून ते सर्वच्या सर्व भाउ जिवंत करू शकत होते. म्हणजे च थोडा काळ मागे जावून टाईम ंंमशीनच्या सहाय्याने भावांना जिवंत करू शकत होते पण त्यापेक्षा महाभयंकर असा उत्पात होवू शकतो हे माहीत असून सुद्धा स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणायचे ठरविले. अर्थात टाईम मशीनचेच हे उदाहरण आहे.ह्यात घडलेले टाळले नसले तरी त्या पितरांना मोक्ष देण्यासाठी त्यावर उपाय शोधला आहे. टाईम मशीनचा उपयोग हा अपवादात्मक  व दुसरा काही उपाय नसेल तरच होत असे. शापातून मुक्त करणे , परत माणूस जिंवत करणे ही टाईम मशीनची उदाहरण आहेत ऐतिहासिक काळी असे बर्याचदा घडत असे. परंतु ६० हजार भावांना जर जिंवत केले असतं तर मृत्युला काही किंमत राहीली नसती. लोक उठ सुठ प्राण वाचवायला टाईम मशीनचा उपयोग करत सुटले असते. आणि अनर्थ घडला असता.आत्मा अमर आहे,  तो नश्वर देह त्यागतो, व  नविन  शरीर धारण करतो. त्यामुळे ते आत्मे मुक्त  होणे गरजेच होते़  ऋषीच्या शापातून  अहिल्या शिळा होवून पडली कित्येक वर्ष ती तशीच पडून होती रामाच्या स्पशाने तीला परत स्त्रीचा जन्म मिळाला व नंतर मोक्षप्...

खंड। १ ला टाईम मशीन भाग:६

इमेज
 माणूस जेव्हा तारुण्यात असतो तेव्हा तो आपल्या प्रगती साठी दूरवर जातो, एकदा हवी तशी प्रगती झाली की पुन्हा त्याला आपल्या गावचे वेध  लागतात. त्याला पुन्हा विश्रांतीसाठी आपलं मूळ गावचं हवं असतं, कारण त्याची पाळमूळ त्याच्या गावच्या मातीतच असतात.  माणूस अनादी काळापासून सतत शोधाच्या मागे लागला आहे. त्याला सतत नविन्याचा ध्यास लागला, पंरतु नविन शोधताना भारत हा असा देश आहे. त्याची मुळ पृथ्वीच्या चंद्राच्या उत्पती पर्यंत जातात. संस्कृती तर स्वर्ग आणि स्वर्गातून पृथ्वी वर आलेल्या गंगेच्या मुळापर्यंत , अक्षय तृतीयेच्या दिवशी भागीरथने गंगा पृथ्वीवर आणली पण ती स्वर्गातून सरळ पृथ्वीवर आली असती तर पृथ्वीवर ची सर्व जीवसृष्टी वाहून गेली असती, पण हिमालयात श्री शंकराने ती आपल्या जटेत धारण केली व अलगद पृथ्वीवर सोडली. कपील ऋषींच्या शापाने राख झालेले राजा सामंजस्य च्या ६० हजार भावांची राख गंगेच्या पाण्यात वाहून गेली व ते शापमुक्त होवून स्वर्गात गेले.  खंड १ क्रमश:भाग६ वर्षा प्र पाटील. ©® लोणी काळभोर

खंड १ला टाईम मशीन भाग :५

इमेज
सरकार दप्तरी काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एवढ्या बखरी/प्रत्येक घराण्याचं कुळ, मुळ वारस हे किती ही प्रत्येक गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य  पातळीवर तंतोतंत राखून ठेवणे. खरचं कठीण, म्हणजे छोटीशी चूक सूद्धा एखाद्याच अख्ख कुळ बदलवू शकते.  ह्यालाच सिस्टीम असे म्हणतात. मूल जन्माला आलं, की घर नंबर,  पासून मुलाची सर्व माहीती दप्तरी जमा होते. ती एकदा का जमा झाली. कि त्याच्या पूढील कितीही पिढ्या, त्याची माहीती मिळवू शकतात. ह्या सिस्टीम मध्ये घोटाळा होता कामा नये. कारण एखादा अधिकारी  नविन पदावर कार्यरत झाला. आणि त्याला कागदपत्रे हाताळताना काही माहिती अपूर्ण/चूकीची/गहाळ असा शेरा मारून पूढील तपासासाठी फाईल पाठवली आणि काही कारणाने त्या अधिकार्यांच बदली झाली. /ती फाईल दडवून ठेवली गेली की तो विषय तिथेच संपतो. काही वेळा भ्रष्ट अधिकारी अशा फाईल गहाळ करतात व तात्पुरत वेळ मारून नेतात. त्या कागदपत्रांचा जिथपर्यंत त्याचा मालक किंमत देत नाही,किंवा गरज पडत नाही. तिथ पर्यत ती सरकार दप्तरी धूळ खात बसते  सरकारी दफ्तरी असलेल्या नोंदणी चा उपयोग घराणे, जमिनीची खरेदी विक्री, जमिन...