नैसर्गिक आपत्ती
नैसर्गिक आपत्ती: भूकंप, भूस्खलन,पूर वादळे, लाव्हा, सुनामी केव्हाही येतात. कधी येेतील तेही नीट तपशीलवार सांगता येत नाही. अशा नैसर्गिक आपत्तीना तोंड देत वसुंधरा आपला जरही तोल ढळू न देता मार्गक्रमण करते. बरे! आपल्या लाडक्या मुलाचा भार खांद्यावर वहावा तसा ,मानव जातीचा भार सतत वाहते. "थकले " म्हणून तिला कुठे जरा खाली, बाजूला आपला भार ठेवता येत नाही. आपण मात्र क्षणभंगूर जिवन जगताना , अपयशातून अनेक विध्वसंक कामे करतो. वसूंधरेला इजा करतो.वृक्ष तेडतो, डोंगर खणतो, नैसर्गिक तोल बिघडवतो. पण तेच आपल्या मनाविरूद्ध काही घडले की लगेच आत्महत्येचा प्रयत्न करतो. पण जर का पृथ्वीने मी आता थकले आहे तूमचा भार वाहून ! मीही जरा विश्रांती साठी थांबते.म्टंहले तर.... , म्हटले तर! आपण निर्सगाचे म्हणणे ऐकण्यास बांधील आहोत. हे मान्य करत नाही. वर्षा प्र पाटील. ©®