भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4
त्या माणसाला पाहूनच मला काठी उचलायची ईच्छा झाली होती. पूढे चालू.... पावसाळा असल्यामुळे रानटी फळे फुले भाज्या उगवल्या होत्या.सुर्य जसा माथायावर येत होता तस तशी सर्व किरणे झाडातून डोकावत होती आणि आक्रामक साडे आकरालाच अंगाची लाही लाही होत होती पावसाळा आणि संपूर्ण डोंगर हिरवागार असूनही वारा वाहत नव्हता. अंग भाजून निघत होतं,मी पाणी विसरलेली होती, .अंगात कोट नव्हता ,मला तहान लागली होती,मी पाण्याने व्याकूळ झाली होती.एकटी असतानाही मला घरी परतून जावेसे वाटत नव्हते.चढण्याची जिद्द चिकाटी तशीच होती.शिवसैनिकांचे आभार मानायला हवेत कारण त्यांनी लाकडी भरीव ओडकें चा छान वापर करून पायऱ्यां तयार केलेल्या आहेत. एकटीच चढण चढत 2वाजता डोंगर चढले.आणखी दोन शार्टकट आहेत तिथून चढताना कमी वेळात चढता येते मी एकटीच होते, तेव्हा थोडी थांबत आणि पायऱ्यांवर चढले.समोरच 5-6कुत्रे माझ्या स्वागता साठी होते.ते मला पाहून भुंकले नाहीत किंवा अंगावर देखील आले नाहीत.समोरच दोन पत्र्यांची घरे बांधलेली होती.खाली उतरणार्या माणसाने वरती कुणी नाही सांगितले ,त्यामुळे तिथे ...