पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

2]भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

दुसर्‍या दिवशी मी  जरा  उशीरा नेच  उठले. आणि माझे  वेळापत्रक कोलमडले.पण जायची जिद्द मात्र सोड़ायाचीच नाही. आज नाही तर कधीच नाही हे वाक्यं माझ्या मनात गूंजी घालू लागले. एक गॉगल आणि पर्स घेवून मी  माझी गाडी घेवून निघाले,  माझी गाडी मी त्यांच्या वस्ती जवळ थांबवली. गाडी लॉक करून मी त्यांच्या वस्तीतून जायला सुरुवात केली. त्यातील ओळखीच्या मुलाच्या घरी गेले. तो मुलगा बाहेर, जायला निघाला होता,  आणि त्याने सांगितले, सर्व मुले रोजंदारीवर गेलेली आहेत,  आणि ती सर्व मूल संध्याकाळी परत येतील. आणि मीही तिथेच जात आहे. मी 2 तास तिथे उशिरा पोहोचले होते. मी  त्या मुलाला माझ्या बरोबर वर ती  चालायची विनंती केली. त्याने काहीही भीती नाही, संध्याकाळी 5 पर्यंत परत खाली या,  तिथ पर्यंत  जर आला नाहीत,  तर  आम्ही मुले वरती  येवू. मी शांत झाले, मी त्या मुलाच्या बोलण्यावर, विश्वास ठेवून चालायला सुरुवात केली. तो मुलगा माझ्या बरोबरच निघाला, आणि विरूद्ध दिशेला गेला.  क्रमशः भाग 2 वर्षा पाटील.  

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

शाळेला सुट्टी पडल्या  की आम्ही  द्रोणागिरी डोंगरावर दररोज जात आसू, आणि इतर वेळा शनिवार रविवार जात आसू,  पावसाळ्यात  गावातील आम्ही सर्व मुले भाजी खुड़ायला, जात आसू, नुकताच पाउस पडून गेल्यावर झालेली ओलसर भुसभुशीत जमीन,  सुंदर हवाहवासा वाटणारा मातीचा गंध,  पाण्याचे ओहळ, आणि  एक  निसर्गाची  निरागस मनाला लागलेली ओढ.  हा  एक  ऋणानुबंध होता  त्या  नकळत्या  वयात  द्रोणागिरी डोंगराशी. सुट्टीत आई वडिलांचा हाथ धरून आम्ही डोंगरावर जाताना एक  विश्वास असायचा,  त्यांनी सांगितलेल्या शिवरायांच्या कथेने छोट्या पावलांना तो डोंगर चढताना स्फुरण येत आसे.  दररोज जाण्यामागे आमची द्रोणागिरी च्या पायथ्याशी वडिलोपार्जित शेतजमीन होती. भला मोठा धबधबा आमच्या शेताच्या बाजूने डोंगरावरून कोसळत आमच्या गावातून जात होता. आम्ही त्याला वीरा म्हणत आसू. त्याच रूप तर अवाढव्य होत, पण तो वाहताना, कड्याकपारीतील झाड  पान , दगड,धोंडे, गुरे ढोरे,  माणसे सुद्धा, घेवून  वाहत असायचा, आणि गावातील लोक माणुसकी म्हणुन ते एकत्र जमून...