पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खंड 2 रा टाईम मशीन भाग 10

इमेज
 जंगल तोड, जमिनीची धूप, भूकंप, सुनामी, डोंगर खोदकाम, ह्याने निसरंगाचा समतोल ढळू लागला, ऋतु चक्र बिघडू लागली. आणि  माणसाला पृथ्वी नष्ट झाली तर .. अशी भिती वाटू लागली, त्यासाठी तो नवनवीन ग्रहांचा अभ्यास करू लागला. हे करत असताना अगदी  पृथ्वी च्या उत्पती पासूनचा अभ्यास सुरू केला. हे करताना त्याला जाणवलं, पूर्वी  ही अनेक सुनामी वादळे, भूकंप येवून अनेक अजस्त्र  जीवसृष्टी  संपुष्टात आलीय, परत जीवसृष्टी तयार होवून नविन प्रगती करता आलीय.   निसर्गाचा समतोल ढळू न देता पृथ्वीच रक्षण करता येवू शकत. अनादी काळापासून करत असलेल्या उपायांचा अभ्यास सुरु झाला, चूका दुरूस्त करून जास्तीत जास्त नैसर्गिक  समतोल राखू शकतो,हे लक्षात घेवून त्यावर उपाययोजना सुरू केल्या. जसं की र्हास होणार्या प्राणी मात्रांचा जीव वाचवणं, वृक्षारोपण करणं, लोकसंख्या आटोक्यालंत ठेवणं, जमिनीची धूप न होवू देणं, गड किल्ल्या चा अस्तित्व  टिकवणं,  इ़   पण हे करताना एक दोन देश एकत्र येवून करणं शक्य  नव्हतं, म्हणून जागतिकरण(जगने एकत्र येवून काही करणे़) करायला सुरूवात केली ...

खंड 2 टाईम मशीन भाग 9

इमेज
कलियुगात लग्न  हा एक अपूर्व  सोहळा असतो पुढील भविष्य  हे काही माहीत नसले तरी सर धोपटपणे,सर्व सामान्य  माणसाच लग्ना  बाबत एक असं स्वप्न  असतं की नवरा  कमावता असावा, घर दार असावं, मुल बाळ असावीत.  नवरा व्यसनी नसावा़़त्याहून पूढे जावून नवरा शिकलेला, बिझनेसमँन गाडी बंगला वाला, असावा़ आता ह्या गोष्टी मिळणं सहज सोप्प ही झालय,लोकांच्या सूखाच्या कल्पना आणि त्या सहज मिळणं याने लोक आळसावलीत, त्यात यंत्र सामग्री  असल्याने सर्व सूख विनासहास मिळू लागली़त. सहज औषधे उपलब्ध  होवू लागली़, त्यामुळे मृत्युच प्रमाणही कमी झाले.  लोकांची दुःख कमी होवू लागली, दुरूस्त करणं, नविन सामुहीक काही करणं, हे लोक नाकारून, स्वतःच्या मनासारखे करू लागले, ते करताना चूक बरोबर न पाहता मनाच करू लागले, त्याचे चांगले वाईट परिणाम  लक्षात घेतले नाहीत. त्याने टाईम मशिनचा वापर  संपून  गेला़,  अहिक सूखाच्या मागे लागून  माणसाने निसर्ग संपवायला सुरूवात केली. प्रचंड लोकसख्य व वृक्षतोड  ह़याने निसर्गाची  हानि झाली़ ती थांबवून नविन उपाययोजना  क...

खंड २रा टाईम मशीन भाग ८

इमेज
आपण रामाला देव मानतो,त्याने आपल्या प्रजेसाठी इतकं सुंदर राज्य तयार केलं,की  जनता रामराज्य येवू देत म्हणून गौरवू लागले त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा प्रभाव त्याने जनतेवर होवू दिला नाही. पण त्याने आपल्या प्रिय पत्नी वर अन्याय केला . मुळात संशयाला जागा नाही तिथे संशय घेतला,ती रावणाच्या महालात न राहता वनात राहीली.एका कथेनूसार रावण आपल्या मुलीला लंकेत घेवुन गेला होता. दुसर्या वेळेला तर ती मुलांसह ऋषींच्या आश्रमात राहीली होती,तिथे संशय घेतल्याने तो आरोप ऋषींवर जातो.आणि असं काही नसताना आरोप करून सोडणं हे निव्वळ सुड घेणं किंवा सितेला तिचं वैवाहीक जिवन,, ऐश्वर्य मिळू न देणं इतकाच हेतू होता.व तो रामाने नाहीतर जनतेचा कौल होता.व रामाने तो मान्य केला. ऋषींच्या आदेशावरून राम व लक्ष्मण शरयू नदीत चालत गेले.त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे पापक्षालन म्हणून त्यांना शरयू नदीत चालत जावं लागलं, असेल का?कारण राजाला सर्व कला अवगत असणं  अपरीहार्य होत. असं असताना दोघाना पोहता  येत असणार !मग ते नदीत चालत गेले म्हणजे आताच्या कलीयुगीन भाषेत सितेचा अपघाती मृत्यु (दरीत पडून)/ तिघांचींही आत्महत्या?  एक ...

खंड २ टाईम मशीन भाग ७

इमेज
प्रत्येक पिढीत स्त्री ला दुय्यम स्थान दिलेले आहे..रामाला वनवास दिला तेव्हा त्याच्याबरोबर जायला सितेला व लक्ष्मणाला परवानगी मिळाली,पण लक्ष्मण पत्नी उर्मिलेला मिळाली नाही.तिला वरीष्ठांची सेवा करण्यास अयोध्येत च रहावे लागले, तिथे तिच्या इच्छेचा प्रश्न नव्हता.तिला पतीचा विरह सहन करावा लागला.रावणाने  सितेचे हरण केल्यानंतर  तिलाही पतीचा विरह सहन करावा लागला.ते कमी म्हणून की काय अयोध्येत परत आल्यानंतर नगरवासीयांनी संशय घेतला ह्या कारणाने परत एकदा तिला पती विरह सहन करून ऋषीमुनींच्या आश्रमात रहावे लागले. ह्यावेळी तिच्या मुलांना प्रशिक्षण मिळाले असले तरी वडिलांच्या प्रेमाला मुकावं लागले. राजकुमार असूनही त्यांना पितृछत्र मिळाले नाही. मुलांना ऋषींनी त्यांच्या वडिलांची कथा सांगितल्यावर राजपुत्र अयोध्येत गेले, त्यांचे तिथे स्वागत झाले, राजपुत्र म्हणून रामाने त्यांचा स्वीकार केला.परत सीतेला आपले राजमहाली जीवन मिळेल असे वाटले, पण परत एकदा तिला अग्नीपरिक्षा द्यायला सांगितले.पुत्रांचा स्विकार केल्यानंतर  मग संशय कसला?नगरवासीयांच्या नावाखाली रामाने एका राजकन्येची एका राणीची अव्हेलना केली.ती...

खंड २रा टाईम मशीन भाग ६

इमेज
"रामायणात " ,श्रावण बाळाचा श्राप. राजा दशरथाला पूत्र वियोगाने मरशील हा खरा होवू नये. रामाच्या मृत्यु मुळे राजा दशज्ञरथाचा मृत्यु होवू नये,म्हणून रामाला वनवासात पाठवले. दशरथाचा मृत्यु पुत्र वियोगामुळेच झाला.पण रामाचा मृत्यु टळला.ह्यात पूढे घडणारी घटना तशीच घडली .त्याचे मूळ कारण तसेच ठेवून त्यला सौम्य रूप दिले गेले. ह्यात आई वडिलांची सेवा करणारा श्रावणबाळ ह्याचे पुण्य खूप होते. त्यानी आपल्या  आई वडिलांची केलेली सेवा व भक्ती ह्या मुळे त्याचा शाप खरा होणार होता.व ते टाळण्यासाठी रामाला वनवास व राजा दशरथाला मृत्यु देवून.शापही खोटा ठरणार नाही.व रामाचा मृत्यु ही होणार नाही हे करविले. ह्यात आलेल्या अडचणींवर मार्ग शोधला.हयात टाईम मशीनचा प्रश्न आलाच कुठे? आपण गृहीत धरले राम हा साधा राजपूत्र आहे.शापाने त्याचा मृत्यू झाला. व वियोगाने  राजा दशरथाचा मृत्यु झाला.तर ती एक साधी कथा झाली असती.रामायण घडले नसते.व राम "देव" अवतार झाला नसता.  किंवा राम प्रिय मुलगा तसाच ठेवून इतर मुलाचा  मृत्यु घडवून(हत्या, विषप्राशन इ.) दशरथाचा मृत्यु पुत्र वियोगाने घडवला असता,तर कदाचित राजा दशरथाला इतके ...

खंड २रा टाईम मशीन भाग ५

इमेज
महाभारतातील  टाईम मशीनचा वापर जर कूरूवंश पूढे योग्य रितीने चालवण्यासाठी केला असता,जर भिष्माला त्याची वंशवेल पूढे सुरू करण्यासाठी उद्युक्त केले असते.तर.... १००कौरवामध्ये एकाला पूर्ण विद्येत निपूण करून त्याचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या आईला गांधारीला तिच्या डोळ्यावरील पट्टी सोडण्यास तयार केले गेले असते. तर...  सर्वगुणसंपन्न एक कौरव तयार करणे कठीण नव्हते. टाईम मशीनचा वापर हा योग्य ठिकाणी चांगल्यासाठीच व चुका सुधारण्यासाठी च. केला पाहीजे. एखाद्या राज घराण्यात असा काही निर्णय घेतला जातो,तेव्हा जनतेला नीट संदेश जात नाही व जनता त्यात हस्तक्षेप करते.व स्वताचे निर्णय लादते. .तेव्हा टाईम मशीनचा वापर विचार करूनच केला पाहीजे. टाईम मशीनचा वापर करताना एखादी चुक पून्हा  होणार नाही ह्याची दक्षता घेतली पाहीजे,व ती चूक पूर्णपणे पूढे टाळता आली पाहीजे. क्रमशः वर्षा पाटील©®

खंड २ टाईम मशीन भाग:४

इमेज
महाभारतातील मुळ वंशज राजा नहुष व त्यांच्या ७पुत्रापैकी दुसरा राजा ययाती होय. .राजा भरत हा वंशवेलीतील १९ वा वंशज,१८ वा राजा  दृशंत्य व शकूतंला चा मुलगा राजा भरत. म्हणून त्या कथेला भरत नाव पडलं व कथा मोठी झाली,म्हणून तिला महाभारत नाव पडले.वंशवेल लिहीताना राजा कुरूपासूनच लिहीली जाते. राजा कुरु हा २६वा राजा तर राजा शंतनु हा ३३वा राजा.राजा शांतनुला दोन पत्नी गंगा तिचा पुत्र भिष्म,व दुसरी सत्यवती तीची दोन,पहिला चित्रांगद व दूसरा विचित्रविर्य भिष्माने लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली,अंबिका व अंबालिका पासून राजा धृतराष्ट व राजा पाण्डू हे पुत्र होत. धृतराष्ट्र व  गांधारी पासून १००पुत्र व पाण्डू व कुंतीचे पांडव पूत्र होत. धृतराष्ट्र हा आंधळा असला तरी, कुरू वंशातील खरा वंशज त्यामुळे कौरव खरे वंशज व गादीचे खरे वारसदार  ठरतात.पाण्डू हा देखिल खरा वंशज होता, पण पाण्डू राजाला शाप असल्याने तो आपल्या पत्नींन बरोबर प्रणय करु शकत नव्हता,व त्यामुळे पाचही पुत्र हे कुरु वंशीय नाहीत.ही बाब बाजूला ठेवली तर पाच पुत्रांना जो नियम लावला तो सूर्य पूत्र कर्णाला लावला तर कर्ण हा सर्वात मोठा पुत्र व तो ...

खंड २ टाईम मशीन भाग ३

इमेज
चंद्रगुप्त मौर्य व चाणाक्य अशा गुरु शिष्याच्या जोडीने सर्व विनाशकारी गोष्टी राज्यातून काढून नविन राज्याची स्थापना केली. तशाच आणखी एका जोडीने नवराष्टाची उभारणी केली.राज्यात अराजकता माजली असताना देशाची धूरी सांभाळण्यास कोणी नाही हे पाहताना आपणच ते कार्य हाती घेतले पाहीजे हे त्या माऊलीने जाणले.व त्याच वेळी तीने आपल्या मुलाला राजा बनवण्याचे निश्चित केले. ती माउली जिजाऊ होती व ज्या मुलाने आपला देश परकियांच्या जुलमातून सोडविण्याचे स्वप्न सत्यात उतरवले ते शिवराय होते. शिवरायांना तयार करताना जिजाऊ एकट्या होत्या.त्यांचे धनी शहाजीराजे  हे परकीयांची चाकरी करत होते.शिवरायांना तयार करा़यला त्यांनाही साधारण ८-१०वर्षाचा काळ द्यावा लागला.म्हणजेच वर्तमानात एखादी घटना दुरूस्त करायचे म्हटलें तरी ती भविष्याची तजवीज होते. शिवरायांनी स्त्रीवरील अत्याचार तिची होणारी अवहेलना थांबवली.त्यानां मान देवून ,गौरवून नविन आदर्श घालून दिला.घराणेशाहीचे वाद हे जिजाऊ व शहाजीराजे ह्यांच्या लग्नाच्या वेळी विकोपाला गेले होते. अशा अनेक घरेलु अडचणींना  त्यांना तोंड द्यावे लागले.तसे वाद शिवरायांनी मुळातून उपटून टाकले‌....

खंड २ टाईम मशीन भाग: २

इमेज
जेव्हा दोन राजघराण्यात लग्न होतात, तेव्हा त्यांची मूळ तपासली जातात.पूढील पिढी तयार करताना ते फार उपयोगाचे असते.,पूढील पिढीत त्यांचे वंशपरंपरागत  रोग दुर्गुण येवू नयेत ह्यासाठी ते काळजी घेतात. चांगलं फळ झाडाला यावं म्हणून माळी जसा दोन चांगल्या झाडांची निवड करून कलम करतो.किंवा दोन जातीवंत घोडे एकत्र आणून नविन घोड्यांची पैदास करतात,त्याच निसर्ग नियमाला धरुन दोन राजघराणी एकत्र येवून ,नविन पिढी अधिक कर्तबगार पिढी तयार करतात.पण केव्हा केव्हा कितीही काळजी घेतली तरि एखाद्या रोग किंवा वाईट संगतीने मुलं फूकट जाण असं राजघराण्यात घडतं.जर राजाला मुलं न होणं,किंवा कोणतंही अपंगत्व घेवून जन्माला आलेलं मुल गादीचा वारस ठरू शकत नसेल तर त्यावर मुल दत्तक घेवून उपाय योजले जात,राजा धनानंद ने आपले दुर्गुण न सोडता राज्य करण्याचा निर्णय घेतला,तेव्हा राज्यात अराजकता माजली,व हे लक्षात आणून देणार्या चाणक्याच्या अपमान केला.आपला देश वाचवण्यासाठी चाणक्यांनी चंद्रगुपताला निवडले.राजा म्हणून. त्याला तालमीत तयार केले,त्यासाठी त्याला आपली १०-१२वर्ष खर्च करावी लागली.अविश्रात मेहनत करावी लागली व   प्रजेला योग्...

खंड२. टाईम मशीन:१

इमेज
निसर्ग चक्रात अनेक घटना कित्येक वर्षा नंतर परत परत घडत  असतात. अनेक उत्पात घडतात.अनेक उलाढाली होतात.अनेक पिढ्या तयार होत असतात.पण त्यात जे अभ्यासपूर्ण आपली नविन पिढी तयार करतात,त्या करताना त्यात चूका नसतात, त्यांचे अनुकरण त्याच पिढीतील,बाकी सारे करत असतात.कठीण अशा तालमीत आणि कडक अशा नियमात तयार केलेली पिढी मग पूढे पिढ्यान् पिढ्या तशाच त्याच कडक नियमांच्या साच्यात घडत असतात,एखाद्या पिढीत कुणीतरी छोटीशी चूक करतो,ती चूक लपवली जाते, किंवा काही प्रकरण दाबले जातं व तसचं पूढीलपिढी कडे    हस्तांतरित केले जाते.आणि मग पूढील पिढीत त्या चूकीतून जे रसायन तयार होतं अनेक गडबडी तयार होतात,की कडक नियम बंधनातून अशा चूका होवू शकत नाही.मग तसेच्या तसं परत हवं असेल,किंवा ते इतकं अभ्यासपूर्ण असेल की त्याला दुसरा पर्याय नसेल तर मागे जिथे ती चूक घडली असेल तसंच्या तसं आयोजन करून ती चूक दुरूस्त केली जाते.त्यासाठी तज्ञ अभ्यासपूर्ण लोक खर्चली जातात, वेळेचा केव्ह केव्हा एका आख्ख्या नविन पिढीचा नाश होतो पण पूढील कित्येक पिढ.या वाचवायच्या असतील तर ते करणं भाग पडतं.ह्यालाच टाईम मशीनचे उदाहरण म्हणता येईल....