मराठी लिटरेचर ब्लाँगमये मी 14-15 कथा,कवीता,स्वयप्रेरीतविचार लिहीलेत.कथा छोट्या पण गहन अर्थ असलेल्या आहेत.
शंका
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
एखाद्या गोष्टीवर जास्त विचार करून मनात शंका निर्माण झाल्या, की त्यातील आंनद हिरावला जावू शकतो.परंतु कधी बिनधास्त राहून बेसावध राहून नाही ती आफत ओढावून घेण्यापेक्षा चांगले.
ऑगस्ट म्हणजे पावसाळी दिवस, सर्वत्र हिरवळ पसरली होती. दगडांवर चिकट घसरण शेवाळ उगवलेली होती. सकाळी 10:30 वाजता आजिबात वारा नव्हता. प्रचंड गरम होत होंत. झाडांच्या सावल्या होत्या, पण तो गारवा शरीराला जाणवत नव्हता. चढनीच्या सुरुवातीलाच हनुमान आणि वेताळाचे मंदिर आहे. मी तिथे पाया पडले. तिथे भगवा झेंडा फडकत होता, त्याला अभिवादन करून पुढे जातच होते. तेवढ्यात एक माणूस हातात काठी, गळ्यात पट्टा घातलेला कुत्रा बरोबर घेवून खाली आला. कुत्राला यू यू करताच दोघेही थांबले. काहीतरी विचारायचे म्हणुन मी विचारले. आजुन कोण वरती आहे का? पण त्याने वरती कुणी नाही नीट जा म्हणाले. तो माणूस पुढे निघाला कुत्रा थोडा घुटमळला, मालका बरोबर जावे, की माझ्या सोबत यावे, ह्या विचारात होता, मालकाने यू ...
शाळेला सुट्टी पडल्या की आम्ही द्रोणागिरी डोंगरावर दररोज जात आसू, आणि इतर वेळा शनिवार रविवार जात आसू, पावसाळ्यात गावातील आम्ही सर्व मुले भाजी खुड़ायला, जात आसू, नुकताच पाउस पडून गेल्यावर झालेली ओलसर भुसभुशीत जमीन, सुंदर हवाहवासा वाटणारा मातीचा गंध, पाण्याचे ओहळ, आणि एक निसर्गाची निरागस मनाला लागलेली ओढ. हा एक ऋणानुबंध होता त्या नकळत्या वयात द्रोणागिरी डोंगराशी. सुट्टीत आई वडिलांचा हाथ धरून आम्ही डोंगरावर जाताना एक विश्वास असायचा, त्यांनी सांगितलेल्या शिवरायांच्या कथेने छोट्या पावलांना तो डोंगर चढताना स्फुरण येत आसे. दररोज जाण्यामागे आमची द्रोणागिरी च्या पायथ्याशी वडिलोपार्जित शेतजमीन होती. भला मोठा धबधबा आमच्या शेताच्या बाजूने डोंगरावरून कोसळत आमच्या गावातून जात होता. आम्ही त्याला वीरा म्हणत आसू. त्याच रूप तर अवाढव्य होत, पण तो वाहताना, कड्याकपारीतील झाड पान , दगड,धोंडे, गुरे ढोरे, माणसे सुद्धा, घेवून वाहत असायचा, आणि गावातील लोक माणुसकी म्हणुन ते एकत्र जमून...
त्या माणसाला पाहूनच मला काठी उचलायची ईच्छा झाली होती. पूढे चालू.... पावसाळा असल्यामुळे रानटी फळे फुले भाज्या उगवल्या होत्या.सुर्य जसा माथायावर येत होता तस तशी सर्व किरणे झाडातून डोकावत होती आणि आक्रामक साडे आकरालाच अंगाची लाही लाही होत होती पावसाळा आणि संपूर्ण डोंगर हिरवागार असूनही वारा वाहत नव्हता. अंग भाजून निघत होतं,मी पाणी विसरलेली होती, .अंगात कोट नव्हता ,मला तहान लागली होती,मी पाण्याने व्याकूळ झाली होती.एकटी असतानाही मला घरी परतून जावेसे वाटत नव्हते.चढण्याची जिद्द चिकाटी तशीच होती.शिवसैनिकांचे आभार मानायला हवेत कारण त्यांनी लाकडी भरीव ओडकें चा छान वापर करून पायऱ्यां तयार केलेल्या आहेत. एकटीच चढण चढत 2वाजता डोंगर चढले.आणखी दोन शार्टकट आहेत तिथून चढताना कमी वेळात चढता येते मी एकटीच होते, तेव्हा थोडी थांबत आणि पायऱ्यांवर चढले.समोरच 5-6कुत्रे माझ्या स्वागता साठी होते.ते मला पाहून भुंकले नाहीत किंवा अंगावर देखील आले नाहीत.समोरच दोन पत्र्यांची घरे बांधलेली होती.खाली उतरणार्या माणसाने वरती कुणी नाही सांगितले ,त्यामुळे तिथे ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा