कंपनी भाग:३



त्यांच्याच वस्तीच्या आजूबाजूला भरलेल्या कणसाच्या ठिक्या  रचून ठेवलेल्या असायच्या, खळ करून सारवून जागा साफ सुथरी करून ठेवलेली असायची, हे सर्व वस्ती वरच्या बायका दरवर्षी करत, तिथेच बाकड्यावर झोडणी व्हायची, 

वर्षभर पुरेल इतका भात तिथेच मोठाली जाती मांडून दळली जायची, किड लागू नये,म्हणून कडीलिंब ,निरगुंडीच्या पानांची औषधी पावडर मिसळून पोती भरली जाई.ती पोती खटार्यात भरून वाड्यापर्यंत  घेवून जायचे, भाताचा एक भाग पोती भरून पुढल्या वर्षी साठी बियांण म्हणून गावासाठी,व स्वतासाठी सांभाळून ठेवलं जाई.
मग भिवा व त्याच्या वस्ती वरची माणसे, ती पोती पाठीवर घेवून पायर्या चढून नेत, नी मागल्या पडवीच्या दाराच्या दगडी जीन्याने चढून वर कोठाराचे दार तात्पुरते उघडे केले जाई, आणि वरून कोठारात धान्याची पोती रीती करत, मग कोठारात वरून आख्खा भाताची बियाणांची पोती रचत.वर्षभरासाठी कोठाराची कवाडे कडी कुलपा सकट बंद होत.
 त्या अंधार खोलीला स्वयंपाक घरातून एक छोटीखानी खिडकी होती.आणि त्या खिडकीतून हवे तसे हवे  तेवढे काढले जाईल.
 दुसरा भाग जे उरलं सुरलं असेल ते बाजारपेठेत नेवून व्यापारी लोकांत नेवून विकण्यासाठी.
 ह्या व्यवहारात  व्यापारी शोधून आणून व्यवहार करायची जोखीम सूद्धा भिवा वरच!.
 वाड्यावरील कोठार वर्षातून एकदा साफ सुथरे करून सारवून जून्या धान्याची पोती परत  पीठी साठी दळायला काढत, ती वाड्यावरच मागच्य पडवीत दळून, दिवाळीपर्यंत नविन राशींची कोठार भरली जात...............  असा  सर्व उरक वर्षभर वाड्यावर चालत, असे. ..

काय रे भिवा काय एवढ, काम काढले मोठ्या मालकाचा आवाज कानी पडला, आणि विचाराच्या तंद्रीतून भिवा भानावर आला,

ओटीवर ठेवलेल्या आराम खूर्चीत धोतर सांभाळत बसत, मालक , म्हणाले ,

गावातून सरपंच तात्याचा निरोप हाय, तातडीची मिटींग धराला सांगितली सांच्याला,

का? कशासाठी?... 

बाजारच्या पोलिसांकडून तूम्हाला रक्षण भी हाय, टेकडी खालची संमधी जमिन सरकार मागतय, कंपनी काढायला, भिवा एका दमात सार बोलला, तूम्हाला निरोप देवून मला परत गावच्या मंडळीला निरोप धाडायला सांगितलंय, सरपंच तात्याने, 

पाटलांना थोडी कल्पना होती, पण एवढ्या तातडीची बैठक म्हणजे दप्तरातील कागद आला, असणार, भिवाने प्रश्नार्थक नजरेने मालका कडे बघिलले, 

जा, मागल्या दारी पडवीत जा चहा पी,  मग गावात निरोप दे, वस्तीवर जाशील तर निरोप देवून लगेच वाड्यावर ये संध्याकाळची बैठकीची नी चहापाण्याची सोय करायला चार माणसं, घेवून ये, तोपर्यंत मी आई साहेबांच्या  कानावर ही गोष्ट घालून येतो, 

भिवा मागच्या पडवीत गेला......... 

क्रमश:

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4