पोस्ट्स

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

त्या माणसाला पाहूनच मला काठी उचलायची ईच्छा झाली होती. पूढे चालू....           पावसाळा असल्यामुळे रानटी फळे फुले भाज्या  उगवल्या होत्या.सुर्य जसा माथायावर येत होता तस तशी सर्व किरणे झाडातून डोकावत होती आणि आक्रामक साडे आकरालाच अंगाची लाही लाही होत होती पावसाळा आणि संपूर्ण  डोंगर हिरवागार असूनही वारा वाहत नव्हता. अंग भाजून निघत होतं,मी पाणी विसरलेली होती, .अंगात कोट नव्हता ,मला तहान लागली होती,मी पाण्याने व्याकूळ झाली होती.एकटी असतानाही मला घरी परतून जावेसे वाटत नव्हते.चढण्याची जिद्द चिकाटी तशीच होती.शिवसैनिकांचे आभार मानायला हवेत कारण त्यांनी लाकडी भरीव ओडकें चा छान  वापर करून पायऱ्यां तयार केलेल्या आहेत. एकटीच चढण चढत 2वाजता डोंगर चढले.आणखी दोन शार्टकट आहेत तिथून चढताना कमी वेळात चढता येते मी एकटीच होते, तेव्हा थोडी थांबत आणि पायऱ्यांवर चढले.समोरच 5-6कुत्रे माझ्या स्वागता साठी होते.ते मला पाहून भुंकले नाहीत किंवा अंगावर देखील आले नाहीत.समोरच दोन  पत्र्यांची घरे  बांधलेली होती.खाली उतरणार्या माणसाने वरती कुणी नाही सांगितले ,त्यामुळे तिथे ...

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

ऑगस्ट  म्हणजे  पावसाळी  दिवस, सर्वत्र  हिरवळ  पसरली  होती. दगडांवर चिकट  घसरण  शेवाळ  उगवलेली  होती. सकाळी  10:30 वाजता  आजिबात वारा  नव्हता. प्रचंड  गरम  होत होंत. झाडांच्या सावल्या होत्या,  पण तो  गारवा  शरीराला  जाणवत  नव्हता. चढनीच्या  सुरुवातीलाच हनुमान आणि वेताळाचे मंदिर आहे. मी  तिथे  पाया पडले. तिथे  भगवा झेंडा  फडकत होता,  त्याला अभिवादन  करून पुढे जातच होते. तेवढ्यात एक  माणूस  हातात  काठी, गळ्यात पट्टा घातलेला  कुत्रा बरोबर घेवून खाली आला. कुत्राला  यू  यू  करताच दोघेही थांबले. काहीतरी विचारायचे म्हणुन मी  विचारले. आजुन कोण वरती  आहे का? पण  त्याने वरती  कुणी नाही  नीट  जा  म्हणाले. तो  माणूस  पुढे  निघाला  कुत्रा थोडा घुटमळला,  मालका बरोबर जावे,  की  माझ्या  सोबत यावे,  ह्या  विचारात  होता,  मालकाने  यू  ...

2]भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

दुसर्‍या दिवशी मी  जरा  उशीरा नेच  उठले. आणि माझे  वेळापत्रक कोलमडले.पण जायची जिद्द मात्र सोड़ायाचीच नाही. आज नाही तर कधीच नाही हे वाक्यं माझ्या मनात गूंजी घालू लागले. एक गॉगल आणि पर्स घेवून मी  माझी गाडी घेवून निघाले,  माझी गाडी मी त्यांच्या वस्ती जवळ थांबवली. गाडी लॉक करून मी त्यांच्या वस्तीतून जायला सुरुवात केली. त्यातील ओळखीच्या मुलाच्या घरी गेले. तो मुलगा बाहेर, जायला निघाला होता,  आणि त्याने सांगितले, सर्व मुले रोजंदारीवर गेलेली आहेत,  आणि ती सर्व मूल संध्याकाळी परत येतील. आणि मीही तिथेच जात आहे. मी 2 तास तिथे उशिरा पोहोचले होते. मी  त्या मुलाला माझ्या बरोबर वर ती  चालायची विनंती केली. त्याने काहीही भीती नाही, संध्याकाळी 5 पर्यंत परत खाली या,  तिथ पर्यंत  जर आला नाहीत,  तर  आम्ही मुले वरती  येवू. मी शांत झाले, मी त्या मुलाच्या बोलण्यावर, विश्वास ठेवून चालायला सुरुवात केली. तो मुलगा माझ्या बरोबरच निघाला, आणि विरूद्ध दिशेला गेला.  क्रमशः भाग 2 वर्षा पाटील.  

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

शाळेला सुट्टी पडल्या  की आम्ही  द्रोणागिरी डोंगरावर दररोज जात आसू, आणि इतर वेळा शनिवार रविवार जात आसू,  पावसाळ्यात  गावातील आम्ही सर्व मुले भाजी खुड़ायला, जात आसू, नुकताच पाउस पडून गेल्यावर झालेली ओलसर भुसभुशीत जमीन,  सुंदर हवाहवासा वाटणारा मातीचा गंध,  पाण्याचे ओहळ, आणि  एक  निसर्गाची  निरागस मनाला लागलेली ओढ.  हा  एक  ऋणानुबंध होता  त्या  नकळत्या  वयात  द्रोणागिरी डोंगराशी. सुट्टीत आई वडिलांचा हाथ धरून आम्ही डोंगरावर जाताना एक  विश्वास असायचा,  त्यांनी सांगितलेल्या शिवरायांच्या कथेने छोट्या पावलांना तो डोंगर चढताना स्फुरण येत आसे.  दररोज जाण्यामागे आमची द्रोणागिरी च्या पायथ्याशी वडिलोपार्जित शेतजमीन होती. भला मोठा धबधबा आमच्या शेताच्या बाजूने डोंगरावरून कोसळत आमच्या गावातून जात होता. आम्ही त्याला वीरा म्हणत आसू. त्याच रूप तर अवाढव्य होत, पण तो वाहताना, कड्याकपारीतील झाड  पान , दगड,धोंडे, गुरे ढोरे,  माणसे सुद्धा, घेवून  वाहत असायचा, आणि गावातील लोक माणुसकी म्हणुन ते एकत्र जमून...

page 1

दुपारचे दोन वाजले होते, मनोहर रावाने आपले किराणा मालाचे दुकान बंद केले, आणि भर उन्हात चालू लागले आता त्यांना पूर्वी सारखे कष्ट होत नव्हते. आणि तसे दुकान सांभाळायची गरज नव्हती पण  नाईलाज होता. ते  विचार करत  स्वताच्या हवेली पर्यंत पोहोचले. पायर्‍या चढून, एक दीर्घ श्वास घेतला, खिश्यातून रुमाल काढून घाम पुसला, आणि समोर  टांगलेल्या पाळण्यावर जावून  बसले. आत ,लक्ष्मी म्हणुन आवाज दिला,...  त्यांची बायको, घाईघाईने  पाण्याची घागर घेवून आली. त्यानी त्या थंडगार पाण्याने आपले, तोंड धुतले.. आणि  हाताने थांब सांगितले, त्यांच्या बायकोने  आपला डोक्यावरचा पदर नीट केला आणि  थांबली. खर  तर  त्यांच्या मुलीचे नाव  लक्ष्मी  होते,  आणि  बायकोचे  नाव  लीला  होते. मुलीचे  लग्न  होवून ती सासरी  निघून गेली होती. तिच्या आठवणीने मनोहर  ने  आपल्या गाईच्या  बछडयाचे नाव लक्ष्मी  ठेवले  होते. तो  मुलगी  झाल्या पासून बायकोला  लक्ष्मीची आई  म्हणुन  हाक  मारा...

सामाजिक बांधिलकी

खडबडीत रस्त्यावर बस थांबली. आणि  पाटील  खाली उतरले. सभोवताली हिरवळ पसरलेली होती. पाटलांचा नोकर हातात पिशवी सांभाळत पाटील काय निरखून पाहतात. ते पाहू लागला. पाटील यांच्या  चेहर्‍यावर स्मित हास्य पसरले. त्यांना थंड वार्‍याच्या झुळुकेने उत्साहित केले. ते तशाच खडबडीत रस्त्यावरून चालू लागले आणि मूक पणे त्यांच्या मागे चालू लागला. पाहता पाहता डोंगराळ भागातील चढण चढून पाटील एका झोपडीवजा घरा जवळ थांबले. त्यांनी बाहेरून जग्या म्हणुन आवाज दिला. नोकराने मागून परत आवाज दिला. आतून एक  बाई हाताला लहान मुलगा धरुन बाहेर आली. पाटलांना ओळखून लांबूनच नमस्कार केला. पाटलांनी जग्या आठ दिवस झाले कामावर  का आला नाही, विचारले, तिने पाटलांना बसायला पथारी पसरली. आतून जावून पाणी आणले. पण पाटीलांनी तिकडे लक्ष दिले नाही.परत त्यांनी तोच प्रश्न केला, आणि घरमालक आजारी आहेत, आतल्या पडवीत झोपलेत सांगितले. पाटलांनी नोकराला पहायला पाठवले. नोकराने खरोखरच जग्या अंथरुणावर झोपलेला आहे ते सांगितले. पाटलांनी आत जावून पाहिले आवाज दिला, पण तो खरोखरच झोपला होता, पाटीलला त्याच्या बायकोने तुमच्या कामाचा खोळंबा ...
डोंगराच्या पायथ्याशी गर्द झाडीत एक गाव लपलेले, होते, एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगराचा विळखा, तर  दुसर्‍या बाजूला त्याला लागूनच असलेला अथांग समुद्र, आणि  त्या  तटावर वसलेल्या गावात निसर्गाची मुक्त हाताने  केलेली उधळण, गाव  छोटे असले तरी,  फळा फुलांनी, पिकांनी समृद्ध. आणि अगदी, शिवरायांच्या काळापासून, नावाने  चालत  आलेल्या आडनावाने त्यांची  हवेली  त्या  शहरात प्रसिद्ध  होती. हवेली  ऊंच पाया असलेली, सागवानी लाकडाचे नक्षी कोरलेले, एका  रेषेत  15 फूटावर  उभारलेले 4 खांब आणि तसेच रुंद ओटा, त्या हवेलीला पेशवेकालीन  झालर होती.   त्या सुंदर दोन मजली हवेलीत,  दोन भाऊ  राहत होते, एक  राघोबा आणि दुसरा, रघुनाथ,  दोघांचे  वडील सीताराम, आणि  त्यांचे वडील  सखाराम  त्यांना  4 मुले  त्या पैकी  एक  "सीताराम" राघोबा आणि रघुनाथचे वडील . मोठा राघोबा आणि  धाकटा रघुनाथ,  राघोबाला नवसाने झालेला  एकुलता एक मुलगा.1903 साली  जन्माला आलेल्या ...

कर्नाळा ट्रीप:-

सकाळी 8:30 वाजता घरातून मी  माथेरान साठी निघाले.जरा उशीरच झाला,पण संध्याकाळी परतीचा प्रवास करून रात्री 10, -11वाजता  घरी पोहचले तरी चालेल.ह्या विचारात सव्वा दहा वाजता पनवेलला पोहचले. मी 6सिटर कडे धाव घेतली.चौकफाट्याहून शाॅर्टकट्स वगैरे घेवून कर्जतला जायचे. पण रिक्षावाल्यांनी असे काही शाॅर्टकट्स नाहीत सांगितलं, मग मी माझा मोर्चा रेल्वेस्टेशन कडे वळवला.टिकीट खिडकीत चौकशी करूनही त्याने मला कल्याण मार्गे तिकीट दिले, एवढा वळसा घालुन जायचे म्हणजे, मी स्टेशनमास्तरकडे चौकशी केल्यावर पूणा डायरेक्ट संध्याकाळी साडेचारची आहे सांगितले,माझे तिकीट कॅन्सल करून द्या सांगितले ,पण त्याने नकार दिला.रिक्षेने मी पनवेल बस स्टॅण्डवर आले, तिथे एक तास थांबून 12:30ची कर्जत बस पकडली. शेजारी दररोज प्रवास करणारा काॅलेजचा मुलगा होता, त्याला कर्जत नेरळ शटल लगेच असते का विचारली. आणि माझ्या वेळेचा ताळमेळ चुकणार हे लक्षात आलं,माथेरानला भोज्जा करून परतावं लागणार हे समजलं, त्या मुलाला कर्नाळाला जायचं असेल तर कुठे उतरायचं, विचारलं आला त्या स्टाॅपलाच उतरा म्हणाला, पण मी दरवाज्यात पोहचेपर्यंत गाडी सुरू झाली, पुढच्या...

फेरफटका

भटकंती हां प्रकार लहानपणी ,ऐन तारुण्यात असतोच पण संसाराच्या डबघड्यातून उसंत मिळाली की चाळीशी नंतर  माणुस परत भटकंतीला सुरूवात करतो.तसेच मीही सुरूवात करायचे ठरवले.३१डिसेंबरचे औचीत्य साधुन मी मुलीला हाॅस्टेलला भेटायला गेली १जानेवारीला माझा वाढदिवसा निमित्ताने महाबळेश्वरला जायचे ठरविले.आम्ही कॅब बुक केली.ऐन वेळी ठरलेल्या पेमेंट पेक्षा एक हजार जास्त मागितले. आणि आमची कॅब कॅन्सल झाली.व.ट्रीपही कॅन्सल झाली.पण मी हट्टाने जायचेच ठरविले. आम्ही स्वारगेट हून सातारा बस पकडली.रात्रीचा झोपून प्रवास करून १:३० वाजता सातार्याला पोहचलो ,पण नुकतीच महाबळेश्वर बस गेली होती व दुसरं कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते.मोबाईल आणि पाॅवर बॅंक चार्ज करायला स्टेशन मास्तर कडून अनुमती घेवून तीथल्या प्लगवर जोडले.थोडी थंडी वाजत होती म्हणून दोन चहा घेवून प्यालो व भटक्या कुत्र्यांसाठी बिस्कीट पुडा घेतला. चार वाजता कॅब आली आणि आम्ही परत १तास प्रवास करून महाबळेश्वरला पोहचलो. एक माणसाने आम्हाला तुम्हाला रूम दाखवतो चला म्हटलं व त्यांच्या पाठोपाठ चालत आम्ही गेलो.रूम नीटनीटकी पाॅश होती. वाॅश घेवून थोडावेळ आराम करून थंड पाण्यात अं...

जिवन(अमृत घट)

हे जिवन असंच असतं, इथे कुणी भरवशाचं नसतं, सुख दुःखा च्या, बेरीज वजाबाकीत, दुखः चं पारडं भरलेलं असतं, हे जिवन असंच असतं, स्वप्न पहाण्याचा आनंद असतो, पण पुर्णत्वाचं काही खरं नसतं, प्रत्येक जण आपल्याच नादात असतो, पण तरी देखील सुखी नसतो, मिळत नाही म्हणून रडत असतो, मिळाल्यावर ही समाधानी नसतो. हे जिवन असंच असतं, मरण येत नाही म्हणून जगायचं असतं, असंच वायफळ म्हणायचं असतं. अमृत घट भरलेला असतो पण तोंडाला मात्र लावायचा नसतो, ,तोंडांत पडेल तितकेंच प्यायच असतं, बाकी सर्व ओघळू द्यायचं असतं, त्या बद्दल शब्द काढायचा नसतो. हे जिवन असंच असतं, माझी तीस वर्षा पूर्वीची कविता वर्षा प्र. पाटील.©®